जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तर अधिकारी प.पु.1008 महामंडलेश्वर

जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तर अधिकारी प.पु.1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज

img

सद्गुरुचे नाममात्र ।तेचि आम्हां वेदशास्त्र । सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरुचे ।या भागवतातील नाथ उक्तीप्रमाणे आपल्या गुरुचेच नाव सर्वश्रेष्ठ मानणारे एक अलौकिक महात्मा म्हणजेच जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज. स्वामी शांतिगिरीजी बाबांचा जन्म साधारणतः १९६१ मध्ये नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव या ठिकाणी माता फुलाबाई व पिता यशवंतराव कांडेकर यांच्या उदरी झाला. घरातील अध्यात्मिक वातावरणाचा बाळ बाबूवर(स्वामी शांतिगिरीजी महाराज) प्रभाव पडत होता. त्याच वातावरणात बाबू वाढत होता.

img

बाबूचे वय १५ ते १६ वर्ष असावे, अचानक बाबूची दृष्टी गेली. फुलामाता व यशवंतराव घाबरून गेले. दवाखाना केला पण काही उपयोग होईना. तेव्हा यशवंतरावाना कुणीतरी सांगितले की त्र्यंबकेश्वर ला एक जनार्दन बाबा आहे, त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे. ते नक्कीच बाबूला दृष्टी देतील. यशवंतराव व फुलामाता बाळ बाबूला घेऊन त्र्यंबकेश्वर ला आल्या बाबाजी श्रमदान करणाऱ्या भक्तांजवळ होते. फुलामाता व यशवंतरावांनी सर्व हकीकत बाबाजींच्या कानावर घातली. तितक्यात बाबाजींनी आपली दृष्टी या बाबूकडे वळविली आणि बाजूचे दगडं उचलायला सांगितली. बाबूनेही खडे उचलायला आणि इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली.

खडे उचलता उचलता आणि फेकता फेकताच बाबूला दिसायला लागले. आई वडिलांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी बाबाजींसमोर दंडवतच घातले. आता मुलाला दृष्टी आली म्हणून आई वडिलांना वाटले की आता बाबूला घरी घेऊन जाऊ. घरी आल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा बाबूची दृष्टी गेली. पुन्हा आई वडील बाबूला बाबांजीकडे घेऊन आले. बाबाजींनी पुन्हा बाबूला दृष्टी दिली. पण बाबाजींनी बाबुच्या आई वडिलांना सांगितले की हा बाबू माझ्यासाठी आहे याला माझ्याजवळच राहुद्या. अशाप्रकारे स्वतः जनार्दन स्वामींनी दिव्य दृष्टी दिलेले महात्मा मणजेच बाबू महात्मा अर्थातच जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेचे विद्यमान बाबाजी स्वामी शांतिगिरीजी महाराज होय.

साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. बाबाजी पहिल्या प्रसादाची पुडी सुद्धा शांतिगिरीजी बाबांनाच देत असायचे. स्नान घालायचं म्हटलं तरी शांतिगिरीजी बाबा पळत पळत जाऊन पुढे उभे असायचे. इतका अधिकार शांतिगिरीजी बाबांचा जनार्दन बाबांवर होता. व जनार्दन माऊली सुद्धा शांतिगिरीजी बाबांवर अपार प्रेम करायची.

सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे. अखंड नऊ वर्षे मौन व्रताची साधना सुरू झाली. एक शब्दही न बोलता जनार्दन बाबांचे पुण्यस्मरण सोहळे सुरू झाले. बाबाजींचे ११ वे पुण्यस्मरण विश्वशांती सोहळा, १३ वे पुण्यस्मरण श्री राम सिता धर्म सोहळा असेल . किंवा १६ वे पुण्यस्मरण जय हनुमान धर्म सोहळा असेल असे अनेक 'न भूतो न भविष्यती' सोहळे करून धर्मसंस्कार शिरोमणीचा पुरस्कार प्राप्त करून घेतला. पुढे २१ वे ते ३० व्या पुण्यस्मरणाची वाटचाल आणि ३१ व्या पुण्यस्मरणाची चाहूल लागलेले एक अलौकीक महात्मा म्हणजेच शांतिगिरीजी महाराज होय.

बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठान, गुरुकुल, श्रमदान, कृषी व ऋषी सेवा आणि गो सेवा या दिव्य पाच परंपरांचे नित्य पालन शांतिगिरीजी बाबा नेटाने करत आहेत आणि लाखो भक्तांकडून करवून घेत आहेत. असंख्य व्यसनी जीवांना व्यसनमुक्त केले. संसारात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना श्रमभक्ती शिकविली. सत्संगाच्या माध्यमातून अनेक पदभ्रष्ट झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. एकनाथी भागवताचे वाचन केले तर समजेल की भागवत म्हणजेच शांतिगिरीजी महाराज आणि शांतिगिरीजी महाराज म्हणजेच भागवत असे दिव्य महात्मा म्हणजेच स्वामी शांतिगिरीजी महाराज होय.

आज ३५ वर्षांपासून ज्यानी अखंड उपवास फलाहार घेतला. साधी भगवी वस्त्र, पायात लाकडी खडावा, बसायला पोत्याचे आसन अन मनात सतत जनार्दन बाबांच्या नावाचे चिंतन असे त्यागी, वैरागी आणि दिव्य ज्ञानी असलेले महात्मा शोधूनही सापडणार नाही. जनार्दन स्वामींचे संकल्प पुरे करून खरी गुरुनिष्ठा काय आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांतिगिरीजी महाराज. दरवर्षी गुरुपौर्णिमा चा भव्य दिव्य सोहळा साजरा करून गुरुचरणांची दिव्य पूजा व अभिषेक करून गुरू ऋण पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. शेतक

री संकटात सापडला तर त्याच्यासाठी पर्जन्ययाग यज्ञ करणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून दाखवून दिले. आज कोरोना संकटातून देशाला नव्हे तर विश्वाला मुक्ती मिळावी म्हणून दैनंदिन होम हवन, महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना भोजनाची व्यवस्था असेल. आज प्रत्येक आश्रमात दोन वेळचे मोफत भोजन अन्नदान सुरू आहे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक जीवाला शांती मिळावी म्हणून सतत प्रयत्नशील राहणे. असे अनेक समाजपयोगी कार्य शांतिगिरीजी बाबा करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वेळेस हजारो साधू संतांना, संन्यासी महाराजांना भोजन देणे, वृक्षारोपण करणे, फळ फुलांच्या झाडांची देखभाल व संरक्षण करणे. असे अनेक उपक्रम शांतिगिरीजी बाबा आश्रमच्यावतीने करत असतात.

"जय जय जनार्दन देवा । निरंतर घडो तुमची सेवा" । या उक्तीप्रमाणे सतत जनार्दन बाबांची सेवा घडावी म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वामी शांतिगिरीजी बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन

इतिहास

img
1989

सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे.

अखंड नऊ वर्षे मौन व्रताची साधना सुरू झाली. एक शब्दही न बोलता जनार्दन बाबांचे पुण्यस्मरण सोहळे सुरू झाले. बाबाजींचे ११ वे पुण्यस्मरण विश्वशांती सोहळा, १३ वे पुण्यस्मरण श्री राम सिता धर्म सोहळा असेल . किंवा १६ वे पुण्यस्मरण जय हनुमान धर्म सोहळा असेल असे अनेक 'न भूतो न भविष्यती' सोहळे करून धर्मसंस्कार शिरोमणीचा पुरस्कार प्राप्त करून घेतला. पुढे २१ वे ते ३० व्या पुण्यस्मरणाची वाटचाल आणि ३१ व्या पुण्यस्मरणाची चाहूल लागलेले एक अलौकीक महात्मा म्हणजेच शांतिगिरीजी महाराज होय.

1998

सन १९९८ साली हजारो भक्तांना सोबत घेऊन शांतिगिरी बाबांनी सद्गुरूच्या संक्ल्प पूर्तीच्या वाटेवर पाऊल ठेवले . व निफाड तालुक्यात एखाद गुरुकुल असावं अशी बाबाजींची इच्छा होती त्या वर्षी उगावखेडे येथे गुरुकुल ची स्थापना करण्यात आली सद्गुरू जनार्धन स्वामींनी आपल्या अवतार कार्यात ९ ठिकाणी जोतिर्लिंग सामान शिवालयाची स्थापना केली होती व उर्वरित ३ ठिकाणी मंदिराचे काम बाकी होते , त्या तिन्ही मंदिरांच्या कामाबद्दल बाबाजींनी स्वामी शांतिगिरी बाबांना माहिती देऊन ठेवल्या होत्या

2002

सन २०००-२००१ या वर्षात शिवपुरी येथे नर्मदेश्वर ,निमगावयेथे रुद्रायेश्वर व टूणकी येथे अमृतेश्वर महादेव मंदिराचे काम बाबाजींना अपेक्षीत अशा लाल दगडात सुरु करून पूर्ण केले. स्वामी शांतिगिरी महाराजांना "श्री पंच दशनाम जुना आखाडा" यांच्याकडून 'महामंडलेश्वर' ही उपाधी देण्यात आली .

त्याच बरोबर महाराजांना स्वामींचे कार्य करत असताना * "अध्यात्म शिरोमणी" ही उपाधी वाराणसी येथे २००२ मध्ये देण्यात आली.

* "धर्मसंस्कार शिरोमणी" पुरस्कार कुरुक्षेत्र येथे २००२ मध्ये सन्मानित करण्यात आले. जागतिक स्तरावर विशेष प्रयत्न केल्याबद्दल हॉलंड येथील ‘ग्लोबल स्पिरच्युअल पार्लमेंटच्या वतीने' पूज्य शांतिगिरीजी बाबांना “श्री स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय हिंदू पुरस्कार” बहाल के ला.

2003

सन २००३ साली ‘वर्ल्ड पीस सेंटर’ यांनी सिंगापूर येथील संस्थेने “विश्वशांतीदूत ” या पुरस्काराने सन्मानित केले.

2004

* "स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय हिंदु पुरस्कार हॉलंड" यांच्याकडून २००४ साली सन्मानित करण्यात आले .

2006

काशी येथील संस्कृत विश्वविद्यालयातील पंडीतांनी शांतीगिरी बाबांच्या कार्याची दखल घेवून त्यांना “अध्यात्म शिरोमणी” हा पुरस्कार प्रदान केला. त्याचबरोबर सन २००६ मध्ये कुरुक्षेत्रावर "धर्मसंस्कार शिरोमणी” हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

2013

* "निष्काम कर्मयोगी" पुरस्कार मॉरिशियस यांच्याकडून २०१३ मध्ये सन्मानित करण्यात आले.

2015

सन २०१५ मध्ये पैठण र्येथे “ब्राम्हण प्रतिपालक”

2016

सन २०१६ मध्ये जेजुरी संस्थानकडून “मार्तंड विजय”

2017

सन २०१७ मध्ये महाराष्ट्र. राज्य मराठी पत्रकार संघाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल “समाजरत्न” पुरस्कारप्रदान करण्यात आला,